प्रस्तावना :-
विशेष सहाय्य योजनेच्या अटी व निकष संदर्भाधीन शासन निर्णयात नमूद केलेल्याआहेत.
सदर शासन निर्णयामधील काही बाबी संदर्भात मा.लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन त्यानुषंगाने मा.मंत्री, (सामाजिकन्याय व विशेष सहाय्य) यांच्या दिनांक २५ ऑगस्ट, २०२० रोजी झालेल्या बैठकीत विशेष सहाय्य योजनेतील निकषांमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
याबाबत सर्वंकष विचार करुन दिनांक २० ऑगस्ट, २०१९ रोजीच्या शासन निर्णयातखालीलप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही पण बातमी वाचा बच्चू कडू यांची खरी कहाणी / कॉलेजला जायचे घोडा घेऊन/ bacchu kadu biogarphy
शासन निर्णय :-
१) अर्ज करण्याची पध्दत:-
विशेष सहाय्य योजनेतील अर्जदाराचे अर्ज तहसिल/तलाठी/ग्रामपंचायत कार्यालयात ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात यावेत. कोणालाही अर्ज न स्विकारता परत पाठविण्यात येऊ नये. प्रत्येक कार्यालयात स्वतंत्र
नोंदवही रजिस्टर ठेवून प्रत्येक अर्जदाराला त्याच्या अर्जाची पोच देणे बंधनकारक राहील.
(पोच पावतीचा नमूना सोबत जोडला आहे.) संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकीसमोर कार्यालयास प्राप्त झालेले सर्व अर्ज समितीसमोर
ठेवावे व सदर प्राप्त अर्जावर समितीने १ महिन्याच्या आत निर्णय घ्यावा.
अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास सदर त्रुटी अर्जदारास कळवून सदर त्रुटींची पूर्तता पुढील
बैठकीच्या आठ दिवस अगोदर करण्यात यावी. सदर अर्ज पुढील बैठकीत मंजूरीसाठी ठेवण्यात यावा. समितीसमोर सदर अर्ज मंजूर अथवा नामंजूर ल झाल्यास संबंधित अर्जदारास त्याचा अर्ज मंजूर अथवा नामंजूर झाल्याचे कळविणे बंधनकारक राहील.
२) वयाचा दाखला:-
अर्जदाराचा अर्ज स्विकारतांना वयाचा पुरावा म्हणून “ग्रामपंचायतीच्या/ नगरपालिकेच्या/ महानगरपालिकेच्या जन्मनोंद वहीतील उताऱ्याची साक्षांकित
प्रत किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणुक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा आधारकार्ड यापैकी एक
रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारी किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या शासकीय वैद्यकिय अधिकारी यांनी दिलेला वयाचा दाखला ग्राहय धरण्यात यावा.”
३) संदर्भाधीन दि. २० ऑगस्ट, २०१९ रोजीच्या शासन निर्णयात “अपंग” याऐवजी “दिव्यांग” असे संबोधण्यात यावे.
४) हयात प्रमाणपत्र:- दि. २० ऑगस्ट, २०१९ रोजीच्या शासन निर्णयात नमूद हयात प्रमाणपत्र
सादर करण्याच्या कालावधीत बदल करण्यात येत असून, सदरचा कालावधी व उत्पन्न दाखला सादर करावयाचा कालावधी समान करण्यात येत आहे.
( विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी दिनांक ०१ एप्रिल ते ३० जून या कालावधीत हयात असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
या कालावधीत प्रमाणपत्र सादर न केलेल्या लाभार्थ्यांचे जुलैपासून अर्थसहाय्य बंद करण्यात यावे. लाभार्थ्यांनी त्याच वर्षाच्या १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत हयात
प्रमाणपत्र सादर केल्यास प्रकरणांतील अपरिहार्यता /अपवदात्मक परिस्थिती विचारात घेऊन लाभार्थ्यांचे बंद केलेले अर्थसहाय्याचे वाटप पूर्ववत करण्यात
यावे.
अन्य प्रकरणांत हयात प्रमाणपत्र सादर केल्यापासून लाभ सुरु करण्यातयावा.)
५) विधवा महिलांबाबत :-
विधवा महिलांकरीता (इतर राज्यातून लग्न होऊन आलेल्या) किमान १५ वर्ष महाराष्ट्र राज्यात रहिवासी असल्याची अट शिथील करण्यात येत आहे.
परंतुसदर महिलेचा पती हा किमान १५ वर्ष महाराष्ट्र राज्यात रहिवासी असणे अनिवार्य राहील.