सोयापेंडीवर स्टॉकलिमिट लावून केंद्र सरकारने पुन्हा एकदा सोयाबीन उत्पादकांवर अन्याय केला आहे..! महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारने केंद्राच्या या भूमिकेपुढे झुकता कामा नये.
ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 18 दिवसात जमा होणार पैसे
केंद्र सरकारने सोयापेंडवर स्टॉक लिमिट लावण्याचे आदेश काढून पुन्हा एकदा सोयाबीन उत्पादकांना मारण्याचा घाट घातला आहे.यापुढे महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांत राज्य सरकारच्या निर्णयावर बाजार अवलंबून आहे. त्यामुळे ही स्टॉक लिमिट राज्य सरकारने लावू नये अशी आमची आग्रही मागणी आहे. शेतकऱ्यांनी आजवर खूप संयम पाळला आहे, सरकारने त्यांचा अंत पाहू नये.